

"द. भि. हे वाङमयप्रेमाने झपाटलेला महावृक्ष होते"
प्रा. मिलिंद जोशी; मसापतर्फे 'स्मरण द. भिंचे' कार्यक्रम साठोत्तरी मराठी समीक्षेचे पात्र द. भिंनी आपल्या समीक्षा लेखनातून अधिक रुंद केले. ते अभिरुचीशी प्रामाणिक असणारे व्रतस्थ समीक्षक होते. त्यांच्या अभिरुचीचा भंग करणाऱ्या साहित्याची त्यांनी कधीही भलावण केली नाही. महाकाव्य ते महाकथा अशी द. भिंच्या समीक्षेची झेप होती. द. भि. हे वाङमयप्रेमाने झपाटलेला महावृक्ष होते असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पु


कवींनी नव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत मसापच्या एक कवयित्री एक कवी कार्यक्रमात मांडला विचार
'मळलेल्या जुन्या वाटांवरून चालणं सोप काम असतं त्यात नवीन असं काही नसतं. पण प्रतिभावंतांनी मनाची मशागत करणाऱ्या नव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत. असे मत प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके आणि कवयित्री संजीवनी बोकील यांनी मांडले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अभिनव उपक्रम एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात adv. प्रमोद आडकर आणि ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी या दोन्ही कवींची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. संजीवनी बोकील म्हणाल्या काव्यनिर्मितीची प्रक्रिया सगळ्यात अवघड असते. काव्


मसापतर्फे स्मरण डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने 'स्मरण दभिंचे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २७ जानेवारी २०१७ रोजी सायं. ६.३० वाजता हा कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात बदलापूरच्या स्व


संपादनासाठीही रियाज आवश्यक असतो इंदुमती जोंधळे यांचे मत : मसापतर्फे दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषि
जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे. विषयाचे नियोजन, लेखकांची निवड यासाठी संपादकांकडे विधायक दृष्टी, सखोल वाचन असावे लागते. संपादनासाठीही रियाज आवश्यक असतो. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी लेखकांप्रमाणे वाचकांचीही आहे. आपली मुले, नातवंडे मराठी वाचतात का, याचा शोध स्वतःच्या घरापासून सुरु करायला हवा. मराठी समृद्ध असल्यामुळे लोप पावणारच नाही; मात्र भाषेचा अधिकाधिक विस्तार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त
मसापच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर, २० जानेवारीला पुरस्कार वितरण
अंतर्नाद, झपूर्झा, साप्ताहिक सकाळ, चतुरंग अन्वय, किशोर आणि डिजीटल (ऑनलाईन) या दिवाळी अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (२०१६) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' अंतर्नाद या दिवाळी अंकाला, 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 'झपूर्झा' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का.


मूल्यगर्भ निर्मितीसाठी साहित्यसाधना आवश्यक भानू काळे यांचे 'मसाप गप्पा' मध्ये मत
काळाने उभ्या केलेल्या प्रश्नाला भिडण्याचे साहित्य हे प्रभावी माध्यम आहे. वाङमयीन संस्कृतीची जोपासना कसदार लेखनातूनच होत असते, मात्र मराठीतील लेखक सन्मान, पुरस्कार, परीक्षणे, समित्या आणि स्वतः साठीची मोर्चे बांधणी यातच गुंतल्यामुळे कसदार लेखनाचा स्रोत आटत चालला आहे असे मत अंतर्नाद मासिकाचे संपादक आणि साहित्यिक भानू काळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात लेखक व पत्रकार सदा डुंबरे यांनी काळे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त


पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पाच जानेवारीला अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे मसाप आणि स. प. महाविद्या
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जानेवारीला पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि पर्यावरण या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. हे संमेलन स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सका