महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार नीतीन मोरे यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी, उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी कवी यशवंत पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी नीतीन मोरे यांच्या 'गात्र गात्र रात्र' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी काव्यसंग्रहाची निवड धनंजय तडवळकर आणि चंचल काळे यांच्या निवड समितीने केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे निमंत्रक म्हणून बंडा जोशी यांनी काम पाहिले. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिनी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.