महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार विनय पाटील यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कारासाठी विनय पाटील (मुंबई) यांच्या 'आदितृष्णा' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवयित्री आश्लेषा महाजन आणि अंजली कुलकर्णी यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे निमंत्रक म्हणून बंडा जोशी यांनी काम पाहिले. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिनी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.